या धनत्रयोदशीला निवृत्ती नियोजनाचे नियोजन करा!

श्री शर्मा यांचा नुकताच अमृत्मोह्त्सव साजरा झाला. या समारंभात त्यांना जमलेल्या त्यांच्या आप्तेष्टांनी त्यांन दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. काहींनी त्यांना १०० वर्ष निरोगी आयुष्य लाभावे या साठी शुभेच्छा दिल्या. परंतु शर्मा त्यांची चिंता वेगळीच होती. शर्मा यांनी त्यांना निवृत्ती पश्चात मिळालेले पैसे एका खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजनेत गुंतविले होते. त्या मधून मिळणारी रक्कम स्थिर असली तरी १५ वर्षांपूर्वी पुरेशी वाटणारी रक्कम आता अपुरी पडायला लागली होती. ते निवृत्त झाले तेव्हा त्यांना खात्री होती की त्यांच्या निवृत्ती पश्चात मिळालेल्या पैशातून ते समाधानाने आयुष्य जगू शकतील परंतु व्याजदर इतक्या झपाट्याने कमी होतील अशी कल्पना नसल्याने त्यांना आता खर्चाचा मेळ घालणे अशक्य झाले होते. शर्मायांच्यासारख्या चुका अनेकजण करतात.

आपले निवृत्तीपश्चात नियोजन वाटते तितके सोपे मुळीच नाही. आपल्या कमावत्या दिवसांत आपण आपले आर्थिक नियोजन कसे करता या वर तुमचे निवृत्तीपश्चातचे जीवन कसे घालवू शकतो हे ठरत असते. आपल्या कमाईच्या वर्षांमध्ये सेवानिवृत्तीचा निधी जितका जास्त असेल तितके आपले सेवानिवृत्ती पश्चातचे जीवन अधिक जीवन सोपे होऊ शकते.

तुमच्या निवृत्तीनियोजनाची तयारी लवकर करा.

निवृत्तीसाठी लवकर योजना करा

तुम्ही वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त होईपर्यंत तुमच्याकडे कमावत्या ३५ वर्षांची कारकीर्द असते. वैद्यकीय शास्त्रातील प्रगतीमुळे, भारतातील सरासरी आयुर्मानात वाढ होत आहे. तुम्ही वयाच्या ९० वर्षांपर्यंत जगाल असे समजून तुमचे नियोजन करा. याचा अर्थ तुम्ही तुमच्या सेवानिवृत्त आयुष्याच्या ३० वर्षांसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. या नियोजनातील एका विरोधाभास असा आहे की तुमच्या कारकिर्दीची ३५ वर्षे पगारासह होती, उर्वरीत ३५ वर्षे निवृत्तीची असतील. आणखी एक विरोधाभास म्हणजे तुमच्या घरखर्चात महागाईमुळे वाढ होईल. वयाच्या ४० व्या वर्षी तुमचा घरखर्च १ लाख होता, तोच खर्च वयाच्या ६० व्या वर्षी रु.२.६५ लाख होईल कारण आणि वयाच्या ८० व्या वर्षी रु. ७ लाख तर वयाच्या ९० व्या वर्षी ११.१५ लाख असेल. थोडक्यात, महागाईमुळे खर्च ५० वर्षांत ११ पपटींनी वाढण्याची शक्यता आहे. ही संख्या अविश्वनीय वाटू शकेल परंतु हे सत्य आहे. परंतु महागाई दर ५ टक्के समजून ही रक्कम काढली आहे. जो वास्तवाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे, आपण महागाईवर मात करणारा परतावा मिळविणे आवश्यक आहे. म्हणूनच कमावत्या वयात सेवा निवृत्तीसाठी मोठ्या निधीची तारातून करणे गरजेचे आहे.

सेवानिवृत्ती कोषाचे व्यवस्थापन
पुरेसा सेवानिवृत्ती निधी तयार करण्यासाठी दोन प्रमुख उपाय आहेत. पहिला उपाय बचातीस लवकर सुरवात करणे आणि दुसरा मोठा हिस्सा इक्विटी आणि इक्विटी म्युच्युअल फंडांत गुंतविणे. पहिल्या उपायामुळे तुमच्या पैशाला दीर्घ कालावधीसाठी चक्रवाढ लाभ होईल. आणि समभाग आणि समभाग संलग्न गुतावाणूकीच्या उच्च परतावा व्युत्पन्न करण्याच्या क्षमतेमुळे चाक्रवाढीचा दर अधिक असल्याने तुमच्या बचतीचे मूल्य तुम्ही टिकवून ठेवू शकाल. उदाहरणार्थ, वार्षिक १२ टक्के परतावा गृहीत धरून २५ च्या वर्षांपासून ६०व्या वर्षापर्यंत मासिक १० हजाराने सुरवात करून दर वर्षी त्यात ५ टक्के वाढ केल्यास १.08 कोटींच्या मुद्दलावर ९.९६ कोटी रक्कम ६०व्या वर्षी उपलब्ध असेल. परंतु गुंतवणुकीस ५ वर्षांचा विलंब केल्यास ५.२५ कोटी चा कोश उपलब्ध होईल. वयाच्या ३० व्या वर्षी म्हणजे ५ वर्षे विलंबाने गुंतवणुकीस सुरवात केल्यास आणि गुंतवणुकीत वार्षिक वाढ न केल्यास ३.२५ कोटी उपलब्ध होतील.
एसआयपी रक्कमेत वार्षिक वाढ करणे आणि निवृत्ती नियोजनाच्या बचतीस लवकर सुरवात करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर पुरेशा रक्कमेचा तुमचा वैद्यकीय विमा असणे देखील आवश्यक आहे जेणेकरुन सेवानिवृत्तीनंतरचे कोणतेही मोठे आरोग्य विषयक खर्च विमा कंपनी देईल. आणि निवृत्ती नियोजन कोष अबाधित राहील. एसआयपी प्रमाणे, येथेही लहान वयात आरोग्य विमा घेतल्यास विम्याचा हप्ता कमी बसेल.
निवृत्ती नियोजनाचा तिसरा भाग म्हणजे तुमचा निवृत्ती कोष किमान ३० वर्षे टिकून राहण्यास सक्षम असायला हवा. तुम्ही आणि तुमच्या जीवनसाथीपैकी शेवटच्या हयात असलेल्या जोडीदारापेक्षा जास्त काळ हा कोश तग धरू शकेल याची दक्षता घेणे आवश्यक आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, निवृत्तीनंतरही म्युच्युअल फंडांची जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार पोर्टफोलिओचे काही भाग वाटप महागाईवर मात करण्यास मदत करू शकतो.

सेवानिवृत्ती कोषाचे व्यवस्थापन पुरेसा सेवानिवृत्ती निधी तयार करण्यासाठी दोन प्रमुख उपाय आहेत. पहिला उपाय बचातीस लवकर सुरवात करणे आणि दुसरा मोठा हिस्सा इक्विटी आणि इक्विटी म्युच्युअल फंडांत गुंतविणे. पहिल्या उपायामुळे तुमच्या पैशाला दीर्घ कालावधीसाठी चक्रवाढ लाभ होईल. आणि समभाग आणि समभाग संलग्न गुतावाणूकीच्या उच्च परतावा व्युत्पन्न करण्याच्या क्षमतेमुळे चाक्रवाढीचा दर अधिक असल्याने तुमच्या बचतीचे मूल्य तुम्ही टिकवून ठेवू शकाल. उदाहरणार्थ, वार्षिक १२ टक्के परतावा गृहीत धरून २५ च्या वर्षांपासून ६०व्या वर्षापर्यंत मासिक १० हजाराने सुरवात करून दर वर्षी त्यात ५ टक्के वाढ केल्यास १.08 कोटींच्या मुद्दलावर ९.९६ कोटी रक्कम ६०व्या वर्षी उपलब्ध असेल. परंतु गुंतवणुकीस ५ वर्षांचा विलंब केल्यास ५.२५ कोटी चा कोश उपलब्ध होईल. वयाच्या ३० व्या वर्षी म्हणजे ५ वर्षे विलंबाने गुंतवणुकीस सुरवात केल्यास आणि गुंतवणुकीत वार्षिक वाढ न केल्यास ३.२५ कोटी उपलब्ध होतील. एसआयपी रक्कमेत वार्षिक वाढ करणे आणि निवृत्ती नियोजनाच्या बचतीस लवकर सुरवात करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर पुरेशा रक्कमेचा तुमचा वैद्यकीय विमा असणे देखील आवश्यक आहे जेणेकरुन सेवानिवृत्तीनंतरचे कोणतेही मोठे आरोग्य विषयक खर्च विमा कंपनी देईल. आणि निवृत्ती नियोजन कोष अबाधित राहील. एसआयपी प्रमाणे, येथेही लहान वयात आरोग्य विमा घेतल्यास विम्याचा हप्ता कमी बसेल. निवृत्ती नियोजनाचा तिसरा भाग म्हणजे तुमचा निवृत्ती कोष किमान ३० वर्षे टिकून राहण्यास सक्षम असायला हवा. तुम्ही आणि तुमच्या जीवनसाथीपैकी शेवटच्या हयात असलेल्या जोडीदारापेक्षा जास्त काळ हा कोश तग धरू शकेल याची दक्षता घेणे आवश्यक आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, निवृत्तीनंतरही म्युच्युअल फंडांची जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार पोर्टफोलिओचे काही भाग वाटप महागाईवर मात करण्यास मदत करू शकतो.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top